अमरावतीत बसचा भीषण अपघात, बस पुलावरून खाली कोसळली 50 प्रवासी जखमी



अमरावती जिल्ह्यात परतवाडा धारणी मार्गावर सेमाडोह जवळ एका खासगी बसचा अपघात झाला असून बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस पुलावरून खाली कोसळून हा अपघात झाला.

या मध्ये तिघांचा मृत्यू झाला तर 50 जण जखमी झाले आहे. मेळघाटातील वळणदार रस्त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले, त्यामुळे बसखाली कोसळली. 

 

या अपघातानंतर काही प्रवासी कसेतरी बाहेर आले आणि उर्वरित प्रवाशांनाही बाहेर काढण्यात आले. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे, तर 50 जण जखमी असल्याचं सांगण्यात येत आहे.

जखमींना तातडीने सेमाडोह प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. एनडीआरएफची टीमही मदत आणि बचाव कार्यासाठी घटनास्थळी रवाना झाली आहे.

Edited By – Priya Dixit 

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top