नाना पटोले यांच्या 'कुत्रा' वक्तव्यावर भाजपच्या अनुराग ठाकूरचे प्रत्युत्तर


anurag thakur

ANI

महाराष्ट्रातील निवडणूक प्रचारात शब्दांची मर्यादा सातत्याने ओलांडली जात आहे. कधी भाजपकडून तर कधी काँग्रेसकडून सातत्याने वक्तव्ये होत आहे. काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले.

भाजपला कुत्रा बनवण्याची वेळ आली आहे. तुमचा खोटारडेपणा पक्षाला दाखवायची वेळ आली आहे.असे वक्तव्य दिल्यानंतर त्यांना भाजपचे खासदार अनुराग ठाकुर यांनी नाना पटोले यांना चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे. 

 

काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य विधानसभा निवडणुकीपूर्वी जाहीर सभेत भाजपवर केलेल्या कथित “कुत्रा”या वक्तव्यावर हल्लाबोल केला. 

 

ते म्हणाले, काँग्रेस प्रत्येक वेळी अशी टिप्पणी करते तेव्हा त्यांना मोठी किंमत चुकवावी लागते.विनाश काळे विपरित बुद्धी असे ते म्हणाले. काँग्रेस जेव्हा कधी अशी स्वस्त मानसिकता दाखवते, घाणेरड्या कमेंट करते आणि चिखलफेक करते, तेव्हा कमळ आणखी फुलते. ज्या-ज्या वेळी काँग्रेस भाजपबद्दल अशा कमेंट करते, त्याची किंमत त्यांना चुकवावी लागते. महाराष्ट्राची जनता त्यांना देईल.असे ठाकुर म्हणाले. 

 

काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सोमवारी अकोल्यात महाविकास आघाडीचा ( एमव्हीए ) प्रचार करताना ,आता भाजपला कुत्रा बनवण्याची वेळ आली आहे, ते इतके गर्विष्ठ झाले आहेत.'' पटोले यांच्या या वक्तव्यावर टीकेची झोड उठली आणि 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात जोरदार प्रचार सुरू असतानाच वादाला तोंड फुटले.

Edited By – Priya Dixit 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top