भारतातील एक असे गाव जिथे फक्त संस्कृत बोलतात


sanskrit
भारतात असे एक अनोखे गाव आहे, जे संस्कृत भाषेवरील समर्पण आणि प्रेमामुळे देशभरात एक उदाहरण बनले आहे. या गावातील प्रत्येक नागरिकाने संस्कृत भाषेला आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवले आहे. तसेच गावातील रहिवासी मग ते धर्म किंवा व्यवसाय कोणताही असो, एकमेकांशी संस्कृतमध्येच बोलतात. आश्यर्च हे की, लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण ही प्राचीन भाषा वापरतात. अगदी स्थानिक दुकानदार, शिक्षक आणि शेतकरी संस्कृतमध्ये संवाद साधतात आणि भाषा जिवंत ठेवण्यासाठी त्यांचे समर्पण आणि प्रेम स्पष्टपणे दर्शवतात.

 

तसेच ते गाव आहे झिरी. झिरी हे गाव मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यात आहे. तसेच इथे गावाच्या भिंतींवर संस्कृत श्लोक, अवतरणे आणि संदेश लिहिलेले आहेत, ज्यावरून रहिवाशांचे संस्कृत भाषेबद्दलचे प्रेम आणि आदर दिसून येतो. या गावाचा हा प्रयत्न संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आहे.

 

झिरी गावाने संस्कृतवरील प्रेमामुळे देशभरात एक खास ओळख निर्माण केली आहे. तसेच झिरी गावाने संस्कृत ही मातृभाषा म्हणून स्वीकारली आहे. झिरी गावात केवळ शाळांमध्येच नव्हे तर मंदिरे आणि चौपालांमध्येही संस्कृत शिकवली जाते. गावातील तरुण मुलांना संस्कृत शिकवण्याची जबाबदारी घेतात आणि लग्न समारंभातही संस्कृत गीते गायली जातात. त्यामुळे येथील सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य घटक संस्कृत बनली आहे. 

Edited By- Dhanashri Naik 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top