जम्मू-काश्मीर येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, 3 दहशतवादी ठार



जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा आणि राजौरीमध्ये दोन वेगवेगळ्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाल्याची बातमी समोर आली आहे. भारतीय लष्कराच्या म्हणण्यानुसार, 28-29 ऑगस्टच्या रात्री तंगधर, कुपवाडा या सामान्य भागात भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्त घुसखोरीविरोधी मोहीम सुरू केली. तसेच उत्तर काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील कुमकडी भागात आणि तंगधार मध्ये तीन दहशतवादी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याचवेळी राजौरीतील चकमकीत दहशतवाद्यांचा मृत्यूही होऊ शकतो. पण अजूनही चकमक आणि शोधमोहीम सुरू असून लष्कराने दहशतवाद्यांचे मृतदेह बाहेर काढलेले नाहीत.

 

गुरुवारी सकाळी राजौरी जिल्ह्यातील लाठी भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. संशयास्पद हालचालींची माहिती मिळाल्यानंतर गुरुवारी सकाळी परिसरात शोधमोहीम राबविण्यात आली. तसेच तपास आणि शोध मोहिमेदरम्यान लपलेले दहशतवादी आणि सैनिक समोरासमोर आले. यानंतर त्यांच्यामध्ये चकमक सुरू झाली. या परिसरात दोन ते तीन दहशतवादी लपून बसल्याचे समजले. दहशतवाद्यांचा खात्मा करून या भागात लष्कराची स्थिती मजबूत करण्यासाठी आणखी सैनिक पाठवण्यात आले आहेत.

Edited By- Dhanashri Naik 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top