मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण मिळणार का? मनोज जरांगेचा भाजपला प्रश्न


manoj jarange
मराठा आरक्षणाला लढा देणारे मनोज जरांगे हे पुन्हा शनिवार पासून उपोषणाला बसले आहे. अंतरवाली सराटी गावात 20 जुलै पासून बसले आहे. मराठा समाजातील सगेसोयरे नात्याला कुणबी म्हणून मान्यता देणाऱ्या अधिसूचनेची तातडीने अंमलबजावणी सरकारने करावी अशी मागणी करत आहे. 

पत्रकारांशी बोलताना त्यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण मिळणार आहे की नाही हे भाजपने स्पष्ट करण्याचे म्हटले आहे. हे सरकार दोन वर्षांपासून सत्तेत आहे. अद्याप त्यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण दिले नाही तर आंदोलकांवर गोळीबार केला. 

मला सरकारने अजून किती दिवस आरक्षण देण्याचे आश्वासन देणार हे सांगावे. शिवाय मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ  यांच्यावर ओबीसी समाजाला भडकवण्याचा आरोप केला. 


राज्य सरकार मराठा समाजाचा 'व्होट बँक' म्हणून वापर करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.भाजपवर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जबाबदारी विरोधी पक्षांवर ढकलल्याचा आरोप केला. उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत जरंगे यांनी विरोधी पक्षांना मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले. 

 

ते म्हणाले, “आम्हाला राजकारणात पडायचे नाही. मात्र, मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही तर त्यांना राजकारणात यावे लागेल. त्यांच्याकडे आता कोणताही पर्याय उरला नाही. 

 

Edited by – Priya Dixit 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top