Nagpur violence : 'येथे कधीही जातीय दंगली झाल्या नाहीत, लोकांनी कोणाच्याही भडकावण्यावर विश्वास ठेवू नये म्हणाले आझमी


abu azmi
Nagpur violence : 'सपाचे आमदार अबू आझमी म्हणाले की, मला खूप दुःख आहे. येथे यापूर्वी कधीही जातीय दंगली झाल्या नव्हत्या, पण यावेळी एवढी मोठी घटना घडली आहे. अनेक लोक जखमी झाले आहे. मला फक्त एवढेच म्हणायचे आहे की लोकांनी कोणाच्याही भडकावण्यावर विश्वास ठेवू नये.

ALSO READ: नागपूर हिंसाचाराबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत प्रतिक्रिया दिली

मिळालेल्या माहितीनुसार नागपूर हिंसाचाराबद्दल राजकीय वक्तव्ये सुरूच आहे. तसेच सपा आमदार अबू आझमी यांनी लोकांना शांततेचे आवाहन केले आहे. अबू आझमी म्हणाले की, नागपूरमध्ये  यापूर्वी कधीही जातीय दंगली झाल्या नव्हत्या, पण यावेळी एवढी मोठी घटना घडली आहे. अनेक लोक जखमी झाले आहे. मला फक्त एवढेच म्हणायचे आहे की कोणाच्याही भडकण्यावर विश्वास ठेवू नका. मी सर्वांना शांतता राखण्याचे आणि देशाच्या प्रगतीसाठी काम करण्याचे आवाहन करतो. औरंगजेबाच्या कबरवरून महाराष्ट्रात सुरू झालेल्या वादाला सोमवारी हिंसक वळण लागले. एका समुदायाचे पवित्र पुस्तक जाळले जात असल्याची अफवा पसरल्यानंतर मध्य नागपुरात लोकांनी पोलिसांवर दगडफेक केली होती. यानंतर, दंगलखोरांनी वाहने पेटवून दिली आणि वाहनांची तोडफोड केली. दोन पोकलेन मशीनही पेटवण्यात आल्या. स्थानिक रहिवाशांच्या घरांवर दगडफेक करण्यात आली.

ALSO READ: राहुल गांधींनी न्यूझीलंडच्या पंतप्रधानांची भेट घेतली

Edited By- Dhanashri Naik 

ALSO READ: मोमोज प्रेमींनो सावधान! कारखान्यात आढळले कुत्र्याचे डोके, मोमोज चाचणीसाठी पाठवले



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top