एकही मतदार नोंदणीपासून वंचित राहू नये – मतदार नोंदणी अधिकारी सचिन इथापे

एकही मतदार नोंदणीपासून वंचित राहू नये – मतदार नोंदणी अधिकारी सचिन इथापे

विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम सुरु

पंढरपूर : आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर भारत निवडणूक आयोगाने राज्यात या वर्षीच्या दुसर्‍या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाची घोषणा केली आहे. त्यानुसार दि. 6 ऑगस्ट रोजी प्रारुप मतदारयादी प्रसिध्द करण्यात आली आहे. त्या यादीमध्ये अजुनही ज्यांची नावे समाविष्ठ नाहीत, अशा मतदारांची नोंदणी करावी. तसेच 18 वर्षे वय पुर्ण असलेल्या पात्र युवक व युवती यांची मतदार नोंदणी करून घेण्यात यावी. एकही मतदार मतदार नोंदणीशिवाय शिल्लक राहू नये, याची दक्षता घ्यावी, असा सुचना मतदार नोंदणी अधिकारी सचिन इथापे यांनी दिल्या आहेत.

महाराष्ट्र राज्यात होणार असलेल्या आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर भारत निवडणूक आयोगाने राज्यात या वर्षीच्या दुसर्‍या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाची घोषणा केली आहे. त्याअनुषंगानेर मतदार नोंदणी अधिकारी सचिन इथापे यांनी पंढरपूर विधानसभा मतदार संघाकरीता उपविभागीय अधिकारी कार्यालय सांस्कृतिक भवन पंढरपूर येथे सर्व राजकीय पक्षाचे प्रतिनिधी,पर्यवेक्षक, मंडळ अधिकारी, तलाठी, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांची बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीमध्ये त्यांनी सुचना दिल्या आहेत.

विधानसभा निवडणूकीपुर्वी पंढरपूर विधानसभा मतदार संघामध्ये वगळण्यात आलेल्या मयत, दुबार व स्थलांतरीत मतदारांची घरोघरी जाऊन पुनश्च एकदा खात्री करून त्यांची नावं चकुन वगळण्यात आले आहेत का ? याबाबत त्यांचे घरी जाऊन खातरजमा करून घ्यावी. तसेच मतदारसंघ वाढ झाल्यामुळे एकूण वीस मतदार केंद्रामध्ये वाढ झालेली आहे. नवीन मतदान केंद्र तसेच स्थलांतर करण्यात आलेली मतदान केंद्र आणि विलीनीकरण करून तयार झालेली मतदान केंद्रे याबाबत मतदारांना सूचना द्याव्यात, सूचना देण्यात आल्या आहेत.

या बैठकीस निवडणूक नायब तहसीलदार वैभव बुचके,राजेश सावळे,महसूल सहाय्यक आर.आर.शिंदे, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, पर्यवेक्षक,मंडळाधिकारी,तलाठी आणि मतदान केंद्रस्तरीय अधिकारी उपस्थित होते.

भारत निवडणूक आयोगाने दि.17 व 18 ऑगस्ट रोजी विशेष मोहीमेचे आयोजन केले.या मोहीमेत सर्व पात्र नागरीक,18 वर्षे पुर्ण केलेल्या युवक व युवती यांची जास्तीत जास्त मतदार नोंदणी करण्यात आली. मतदार लिंग गुणोत्तराचे प्रमाण वाढविण्यात यावे.आगामी विधानसभा निवडणूकीमध्ये कोणाचीही तक्रार येणार नाही याची दक्षता घेणेबाबत सुचना दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top